जळगाव समाचार डेस्क;
जळगाव (Jalgaon) तालुक्यातील सुभाषवाडी येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बद्रीसिंग पुना चव्हाण (५८), हे सुभाषवाडी ता. जळगाव येथील राहिवारी असून आपल्या परिवारासह येथे वास्तव्यास होते. ते शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असत. मंगळवारी दि. १६ रोजी सकाळी त्यांची पत्नी, दोन्ही मुले आणि सुना शेतात गेले होते. त्यावेळी त्यांचे नातू आणि बद्रीसिंग चव्हाण हे घरीच होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. त्यांचा नातू पाणी पिण्यासाठी घरात आला तेव्हा ही घटना उघडकीला आली. तेव्हा त्याने कुटुंबातील इतरांना माहिती दिली. त्या वेळी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलेले होते. त्या तणावात ते राहत होते, असे नातेवाईकांनी सांगितले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि सुना व नातवंडे असा परिवार आहे.