नवी दिल्ली, 7 मे 2025: पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी 7 मे 2025 रोजी पहाटे 1:44 वाजता ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम यशस्वीपणे राबवली. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीर (पीओके) मधील 9 दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करून त्या पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्या. ही मोहीम भारतीय हवाई दल, लष्कर आणि नौदलाच्या समन्वयाने राबवण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धकक्षातून या कारवाईवर लक्ष ठेवले.

![]()




