जळगाव समाचार | २० ऑगस्ट २०२५
नवादा , बिहार – निवडणूक आयोग आणि भाजप यांनी मतचोरीसाठी हातमिळवणी केली आहे. मात्र बिहारमध्ये महागठबंधन एकाही मताची चोरी होऊ देणार नाही, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केला.
बिहारमधील ‘मतदार अधिकार यात्रा’च्या तिसऱ्या दिवशी नवादा येथील भगतसिंह चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. “मतदानाचा अधिकार हा तुम्हाला संविधानाने दिला आहे. मात्र केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग हा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत,” असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “तेजस्वी यादव, मी आणि महागठबंधनातील सर्व नेते जनतेला आश्वस्त करतो की, बिहारमध्ये एका मताचीही चोरी होऊ देणार नाही. निवडणूक आयोग आणि भाजपने हरयाणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील निवडणुकांत मतचोरी केली. महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान तब्बल एक कोटी नवीन मतदार जादूच्या कांडीने जोडले गेले,” अशी टीका त्यांनी केली.

![]()




