आमदार राजूमामा भोळे यांचे सपत्निक वाघूर धरणाचे जलपूजन; जळगाव शहराची दोन वर्षांची पाणीटंचाई मिटली…

 

जळगाव समाचार डेस्क| ५ सप्टेंबर २०२४

जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे 22 किलोमीटरवरील वाघूर धरण यंदा वरुणराजाच्या कृपेने 100 टक्के भरले आहे. यानिमित्ताने बुधवार, 4 सप्टेंबर 2024 रोजी, आमदार राजूमामा भोळे यांनी सपत्निक धरणस्थळी जलपूजन करून परमेश्वराचे आभार मानले. हिंदू संस्कृतीनुसार साडीचोळी, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
जलपूजन सोहळ्यात तापी पाटबंधारे महामंडळाचे अभियंता पी. एम. पाटील, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले, सहाय्यक अभियंता विशाल सुर्वे, तापी पाटबंधारे सहाय्यक अभियंता अजय जाधव यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.
वाघूर धरणाच्या पाण्यावर जळगाव शहरासह जामनेर, भुसावळ आणि परिसरातील गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पुढील दोन वर्षांसाठी शहराच्या पाणीपुरवठ्याची चिंता मिटली आहे. 1978 मध्ये बांधलेल्या धरणाचा हा चौथा प्रसंग आहे, जेव्हा ते 100 टक्के भरले आहे. या जलपूजनात सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना वरुणदेवतेला करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here