जळगाव समाचार डेस्क| १० ऑक्टोबर २०२४
ज्येष्ठ उद्योगपती आणि पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्रात आज एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
दुखवटा पाळण्याच्या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार असून, कोणतेही मनोरंजन किंवा करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
रतन टाटा यांच्या समाजातील योगदानाचा विचार करता, त्यांच्या स्मरणार्थ हा शासकीय निर्णय घेण्यात आला आहे.

![]()




