धक्कादायक; अख्ख्य कुटुंबच आढळले फासावर, सर्वत्र खळबळ…

जळगाव समाचार डेस्क;

मध्य प्रदेशातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अलीराजपूर जिल्ह्यातील वालपूर भागात एका घरात पती, पत्नी आणि तीन मुलांचे मृतदेह लटकलेले आढळले. ही हत्या की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत. एसपी राजेश व्यास घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पाचही मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. प्रकरण गुणेरी पंचायतीच्या राउडी गावचे आहे.
ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राकेश जगर सिंह, ललिता राकेश, त्यांची मुलगी लक्ष्मी, मुलगा प्रकाश आणि अक्षय यांचे मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळले. सकाळी राकेशचे काका घरी पोहोचल्यावर त्यांना हा प्रकार कळला. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. खून की आत्महत्येचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सर्व पक्षांची विचारपूस केली जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here