जळगाव समाचार | २७ मे २०२५
बीड जिल्ह्यातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलाजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. गढी पुलावर एका एसयूव्हीने डिव्हायडरवर धडक दिली आणि गाडी थांबली. या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र गाडी डिव्हायडरमध्ये अडकली असल्याने गाडीतील सर्व लोक बाहेर आले.
त्या वेळी महामार्गावरून जात असलेल्या भरधाव ट्रकने त्या सहा जणांना जोरदार धडक दिली. यात बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी असून त्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे गेवराई शहरात शोककळा पसरली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.