भुसावळ (प्रतीनीधी) : जळगाव शहरातील रहिवासी असणाऱ्या एका 50 वर्षीय महिलेने तापी नदीच्या पात्रात पुढे घेऊन आत्महत्या केल्याची घटना 30 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडके साले असून याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आले आहे.
बबली अरुण ढंढोरे वय ५० रा. शनिपेठ जळगाव, असे मृत महिलेचे नाव आहे.
बबली ढंढोरे ही महिला सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता तापी पुलावर पोहोचली. नंतर त्यांनी नातेवाईकांना संपर्क करत आत्महत्या करत असल्याचे सांगत काही क्षणात तापी पात्रात उडी घेतली. यावेळी पुलावरून जाणारे माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी महिलेस वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, ती पाण्यातील दगडावर आदळल्याने मृत झाली.
काही वेळाने महिलेचे नातेवाइक घटनास्थळी आले. कोठारी यांनी पोहणाऱ्यांना बोलवून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबत भुसावळ शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याचे सूत्रांनी सांगितले.