शिरसोली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाल्याची घटना आज १० रोजी सायंकाळ ५ वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
कांतीलाल उर्फ कान्हा रमेश राठोड (वय २४), आणि रवींद्र किसन चव्हाण (वय ३०, दोन्ही रा. विटनेर तांडा ता. जळगाव) अशी मृतांची नावे आहेत. नावे आहे. कांतीलालच्या पश्चात आई आणि मोठा भाऊ तर रवींद्र चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, काका, आजोबा आणि काकू असा परिवार आहे. गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दोघेजण दुचाकी क्रमांक नंबर (एमएच १९ इएल ३११) ने शिरसोलीकडून जळगावकडे येत होते. शिरसोली गावातील आकाशवाणी केंद्रच्या टॉवर समोरून भरधाव कारने जोरदार धडक दिली.
घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत खाजगी वाहनातून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. दरम्यान विटनेर तांडा गावावर शोककळा पसरली आहे.