सर्पदंशाने 47 वर्षीय शेतमजुराचा मृत्यू…

 

जळगाव समाचार डेस्क;

सध्या पावसाळ्यामुळे सापांचा मुक्त विहार दिसून येतो. शेतात किंवा अडगळ असलेल्या ठिकाणी ते हमखास निदर्शनास येतात. त्यामुळे अनेक ठिकाणी सर्पदंशाच्या घटना होत असतात. अश्यात एका शेतमजुराचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज तालुक्यातील बोरनार येथे घडली. संजय हिरामण पाटील (४७) असे मयत शेतमजूराचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संजय पाटील हे जळगाव तालुक्यातील बोरनार गावात आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. शेतमजूरी व शेळीपालनाचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे मंगळवार, ९ जुलै रोजी सकाळी ६ वाजता ते बकऱ्यांना चारा घेण्यासाठी गावाजवळील शेतात गेले असतांना, आपल्या कामात व्यस्त असतांना त्यांना सर्पदंश झाला, हि बाब लक्षात येताच गावातील नागरिकांनी त्यांना जळगाव येथे उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी डॉ. रक्षा रोकडे यांनी मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here